भूसंपादन घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक न्यायालयीन कोठडीत; जेलमध्ये रवानगी

यशश्री अपडेट्स -बीड

73 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची 7 दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर त्यांची बीड येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलिस कोठडीत महत्वाचे पुरावे व धागेदोरे मिळाले असल्याची सुत्रांची माहिती आहे. पाठक व त्यांच्याशी संबंधित असलेले व्यक्ती व त्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर आहेत.

पाठक यांच्या लातूर येथील निवासस्थानी 2 तासापेक्षा जास्त झाडाझडती घेऊन लॅपटॉप, टॅब अन् मोबाइल असे डिजिटल पुरावे जप्त केले असुन या वस्तु फॉरेन्सिक तपास व डेटा मिळवण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आल्या आहे. भुसंपादन मावेजा घोटाळ्याशी संबंधित एकूण 154 संचिकांपैकी 148 फाईल्स पोलिसांच्या हाती लागल्या असुन 6 संचिका गहाळ आहेत, पोलिसांनी हस्तगत केलेल्या 3 फाईल्स अत्यंत महत्त्वाच्या असून, त्या न्यायाधीशांकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. 241 कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप असुन त्यातील 73 कोटी वितरित केल्याने गुन्हा नोंद आहे.

पाठक यांची मालमत्ताही आता रडारवर आली आहे. घोटाळ्याच्या काळात त्यांच्या खात्यांवर अथवा कुटुंबीयांच्या खात्यांवर काही संशयास्पद व्यवहार आहेत का, याचीही पडताळणी केली जात आहे भूसंपादनाचे सर्व बनावट आदेश पाठक यांनी स्वताच्या लॅपटॉपवरूनच तयार केल्याचा युक्तिवाद तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी सचिन पांडकर, व्यंकटराम या अधिकारी यांची टीम तपास करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *